कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पावसाने घराची भिंत कोसळली

 


संगमनेरतालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने भाऊसाहेब रखमा डोलनर यांच्या राहत्या घराशेजारील स्वयंपाक गृहाच्या पाठीमागील बाजूची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

मंगळवारी सायंकाळी ७ नंतर साकुर,घारगांवसह पठार भागातील मांडवे बुद्रुक, शिंदोडी, कौठेमलकापूर, बिरेवाडी, हिवरगाव पठार, नांदूर खंदरमाळ, हिरेवाडी, दरेवाडी, रणखांब, खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, तसेच वरंवडी परिसर धुवांधार पाऊसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र नागरिकांची एकच धांदल उडाली होती. साधारणपणे रात्रभर पाउस सुरु होता. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच शेतातील पिकांमध्ये पाणी साचल्याने पाहायला मिळाले. बाजरीचे पीके काही ठिकाणी शेतातच कोलमडून पडल्याचे चित्र आहे. 


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु