कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

वाळूचे सर्वंकष धोरण ठरवणार- विखे पाटील

 


राज्यात वाळूला राजाश्रय कोण देत आहेत, त्याचा शोध घेऊ. तसेच शेजारील राज्यांत वाळूबाबत नेमके काय धोरण आहे, त्याची माहिती घेऊन राज्यात वाळूचे धोरण निश्चित केले जाणार. त्याबाबतच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

  विखे पाटील यांनी गुरुवारी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. त्यात त्यांनी लम्पी आजारासंदर्भात माहिती त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. वाळू तस्करीबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, वाळू माफियांचा उच्छाद राज्यात वाढला आहे. वाळू माफियांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून गुन्हेगारीकरण वाढले आहे. त्याचा नायनाट करावा लागणार आहे. त्यासाठी शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये वाळूचे नेमके काय धोरण आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु