कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन

 


संगमनेर /तालुक्याच्या पठार भागात गणरायाच्या आगमनानंतर सुरु झालेल्या  मुसळधार पावसाने पठार भागातील अनेक पाझर तलाव ओसंडून वाहू आहे.

    त्यामुळे  ओढे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असून पठार भाग जलमय झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान घारगांव परीसराला वरदान ठरत असलेला शिदायकवाडी येथील बोल्हाई माता पाझर तलावही भरुन ओसंडून वाहू लागल्यानंतर घारगांव ग्रामस्थ व कॉंग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या हस्ते  रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी या पाझर तलावाचे जलपूजन करण्यात आले. 


भागातील पाझर तलावांना मोठ्या प्रमाणात गळती होती ही गळती बंद करण्यासाठी मागील वर्षी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या माध्यमातून यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजित भाऊ थोरात यांच्या प्रयत्नातून या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम झाले आहे त्यामुळे नव्वद ते 95 टक्के धरणाची गळती थांबली आहे त्यामुळे घारगांव परीसरातील शेतकऱ्यांची शेती सह पिण्याच्या पाण्याची अडचण आता दुर झाली आहे.

अजय फटांगरे

( मा. जिल्हा परिषद सदस्य )

यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष दादा पाटील आहेर, सामाजिक कार्यकर्ते सुदेश आहेर,पप्पू चौगुले,राजेंद्र आहेर,दिलीप आहेर,सुनील आहेर,जगदीश आहेर,रामदास गवांदे,उमेश आहेर, ज्ञानेश्वर आहेर,सुनील डोके,अमीर शेख, रामप्रसाद आहेर, बापू आहेर,सचिन गाडेकर,संतोष नाईकवाडी,सोपान गाडेकर,पोपट भालके, सावकार आहेर,देविदास घोलप,रोहित गाडेकर, सुरेश गाडेकर नितीन कडाळे यांसह आदीं यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु