कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

महसूलचा स्तुत्य उपक्रम...

 संगमनेर मध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी शिबिराचे नियोजन


चला जबाबदारी पार पाडूया माझ्या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडुया...

मा. भारत निवडणूक आयोगामार्फत ऑगस्ट २०२२ पासून मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदान कार्डला आधार क्रमांक जोडणी करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने आधार जोडणी शिबिराचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.


तरी २१७ संगमनेर विधानसभा मतदार संघामध्ये याबाबत मा.मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी गावोगावी व मतदान केंद्र स्तरावर शिबिराचे नियोजन करण्याबाबत बैठक पार पडली असून शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २१७ संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. कि या दिवशी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांचे मतदान कार्ड हे आधार क्रमांकाला लिंक करण्याचे काम करावे. या द्वारे सर्व मतदारांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना याकामी सहकार्य करावे.

तसेच २१७ संगमनेर मतदार संघातील दिनांक 1 ऑगस्ट २०२२ ते ८/०९/२०२२ पर्यंत २७६१३८ मतदारांपैकी १५२५७५ इतके मतदारांचे एकूण 55.97 टक्के आधार जोडणीचे कामकाज पूर्ण झालेले असून राज्यात २९७ संगमनेर मतदारसंघाचे काम आघाडीवर असून मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे अभिनंदन केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु