कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

 


संगमनेर /(गणेश भोसले) तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील रामदास भिकाजी पिसाळ यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास भिकाजी पिसाळ हे घारगांव गावठाण लगत राहत असून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी गाई पाळल्या आहेत.गुरवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान पिसाळ यांच्या गाईच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत एक वर्षाच्या कालवडीवर हल्ला करत ठार केले. दरम्यान पिसाळ यांचा मुलगा शंतनु हा घराबाहेर आला असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने शंतनु हा पुरता घाबरून गेला व त्याने आरडाओरडा करताच घरातील सदस्यही बाहेर आले.व आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. मात्र त्याआधी बिबट्याने कालवडी वर ताव मारला होता.



पिसाळ हे गावठाण परीसरात राहत असून जंगल सोडून बिबटया गावात येऊन त्यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केल्याने घारगांव गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परीसरात पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु