कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आजारी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश..

 


संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावाअंतर्गत असणार्या सांगडेवाडी परीसरातील पटेलदरा येथे आजारी अवस्थेतील दोन ते सव्वा दोन वर्षे वयाची बिबट्या मादी आढळून आल्याची घटना बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,कुरकुंडी परीसरात मोठ्या प्रमाणात डोंगर दर्या असून अनेक गुराखी आप आपली जनावरे चारण्यासाठी डोंगर दर्या मध्ये फिरत असतात. असेच सांगडेवाडी येथील त्रिंबक सांगडे हे  जनावरे चारत होते.तर त्यांना जनावरे चारत असताना अचानक गुरगुरणयाचा आवाज आला.तर त्यांनी पाहिले असता त्यांना बिबट्या आढळून आला. तर कुरकुंडी ते सांगडेवाडी रस्त्याच्या लगतच हा बिबट्या निपचित पडलेला असल्याने. त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमली होती. 
घटनेची माहिती कुरकुंडी गावचे सरपंच शाहीन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना याबाबतची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आजारी बिबटयावर जाळी टाकून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले 

तर यावेळी  वनपरीक्षेत्रअधिकारी सचिन लोंढे, वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे,श्रीकिशन सातपुते,संतोष पारधी,दिलीप उचाळे,ज्ञानेश्वर कोरडे, ,तान्हाजी फापाळे,बाळासाहेब वैराळ ,आनंथा काळे,दिपक वायळ अशी टीम त्या ठिकाणी येत त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करत पुढील उपचारासाठी घेऊन गेले.     यावेळी सरपंच शाहीन चौगुले, पप्पू चौगुले,राजू ,सांगडे,त्रिंबक सांगडे ,वैभव सांगडे, जाकिर पटेल, दशरथ सांगडे यांसह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु