कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात दोन ठार एक जखमी

 



संगमनेर /तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गावरील उड्डानपुलाचा कठड्याला तोडून खाली कोसळली. या भीषण अपघातात कारमधील  दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हिवरगाव पावसा येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दिनांक.२० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. प्रथमेश विकास कुरकुटे (वय 22, रा. कुरकुटवाडी) आणि अभिषेक साहेबराव रहाणे (वय 30, रा. चंदनापुरी) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.



या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील रहिवासी असणारा प्रथमेश विकास कुरकुटे, पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असणारा विजय काळे तसेच चंदनापुरी येथील रहिवासी असणारा अभिषेक साहेबराव रहाणे हे तिघेजण चंदनापुरीहुन नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घुलेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते.


दरम्यान यांची कार हिवरगाव पावसातील महामार्गाच्या उड्डाण पुलावर आली असता अचानक कार चालवणाऱ्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात प्रथमेश कुरकुटे हा जागेवर ठार झाला तर अभिषेक साहेबराव रहाणे याचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. तसेच तिसरा व्यक्ती विजय काळे सध्या गंभीरित्या जखमी असून त्याच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु