कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

सावधान.. पठारावर बंद घरे चोरट्यांकडून लक्ष

 संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम भागातील भोजदरी गावात अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून मंगळवार दिनांक  ६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी बंद घरे लक्ष करत चोरी केल्याची घटना घडली आहे 

याबाबत अधिक माहिती अशी,भोजदरी गावातील अंबादास सावळेराम डोंगरे, व बन्सी गोपाळ वाळुंज यांची बंद घरे लक्ष करत चोरट्यांनी चोरी केली आहे. अंबादास डोंगरे हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांची शेती भोजदरी येथे आहे व राहण्यासाठी शेतात घर आहे.तर बन्सी वाळुंज हे गणपती पाहण्यासाठी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोनही घरांच्या दरवाज्याचे कोंडे तोडले व आतमध्ये प्रवेश केला.

घरातील कपाट , पेट्या, डब्यांसह घरातील सर्व सामानाची  उचकापाचक करुन चोरी करत पोबारा केला. दरम्यान आजुबाजुच्या नागरीकांच्या ही गोष्ट  लक्षात येताच त्यांनी डोंगरे व वाळुंज यांना याबाबतची माहिती दिली.मात्र हे दोन्ही घरवाले मुंबईला असल्याने काय व किती चोरी झाली आहे हे मात्र समजू शकले नाही.

दरम्यान मागील काही महिन्यांपासून भोजदरी गावात अनेक घरांमध्ये चोऱ्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या मोटारी,केबली, शाळेतील कॉम्प्युटर, मंदिरातील दानपेटी अश्या विविध ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे घारगांव पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पोलिस पाटील गणपत हांडे, चेअरमन शिवाजी वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भारती,पोपट वाळुंज,शरद तपासे, सुनिल लोहटे,शिवाजी उगले , दिलिप पिंपळे, नंदू कदम, फक्कड हांडे, सुनिल लांडगे,कुंडलिक हांडे, शिवाजी हांडे,बबन मते, शांताराम डोंगरे,दिगंबर हांडे , सुमित लांडगे यांसह आदि ग्रामस्थांनी केली आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु