कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

वाघवाड्यात घुसून बिबटयाचा हल्ला...

 

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार

शेळकेवाडी येथील घटना..


संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या शेळके वाडी येथील वाघ वाड्यात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार झाल्याची घटना गुरवारी दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.



     याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय दामू वाघ हे आपल्या कुटुंबासोबत शेळकेवाडी येथे राहत आहेत.व शेती बरोबरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. व घरासमोर शेळ्यांचा गोठा बांधला आहे. गुरवारी रात्री अचानक बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत शेळीला ठार करत शेळी घेऊन पलायन केले. व तेथेच असणार्या कोंबड्यांचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. तर सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट वाघ यांच्या लक्षात आली.शेळी व कोंबड्या एकाच वेळी ठार केल्याने एक पेक्षा जास्त  बिबटे  असण्याची शक्यता वाघ यांनी वर्तवली आहे.


घटनेची माहिती समजताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान परीसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कायमच बिबट्यांचा वावर या ठिकाणी असतो त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने परीसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सुधिर वाघ, अभिजीत घुले, रमेश वाघ,बाळशीराम मधे यांसह आदिंनी  केली आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु