कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार
शेळकेवाडी येथील घटना..
संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या शेळके वाडी येथील वाघ वाड्यात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार झाल्याची घटना गुरवारी दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय दामू वाघ हे आपल्या कुटुंबासोबत शेळकेवाडी येथे राहत आहेत.व शेती बरोबरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. व घरासमोर शेळ्यांचा गोठा बांधला आहे. गुरवारी रात्री अचानक बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत शेळीला ठार करत शेळी घेऊन पलायन केले. व तेथेच असणार्या कोंबड्यांचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. तर सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट वाघ यांच्या लक्षात आली.शेळी व कोंबड्या एकाच वेळी ठार केल्याने एक पेक्षा जास्त बिबटे असण्याची शक्यता वाघ यांनी वर्तवली आहे.
घटनेची माहिती समजताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान परीसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कायमच बिबट्यांचा वावर या ठिकाणी असतो त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने परीसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सुधिर वाघ, अभिजीत घुले, रमेश वाघ,बाळशीराम मधे यांसह आदिंनी केली आहे.
Comments
Post a Comment