कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

विजवाहक तारेच्या धक्क्याने त्याचा जीव गेला.

 


    संगमनेर /( सतीष फापाळेतालुक्याच्या पठार भागातील वनकुटे येथे विजवाहक तारेच्या धक्क्याने कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

        याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वनकुटे गावा अंतर्गत असणाऱ्या चिमटा रोड परिसरातील अशोक भाऊ कारंडे यांच्या शेतजमिनी जवळ पावसाने विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत असताना .तेथून कोल्हा मार्गक्रमण करत असताना  विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला  आहे.



     दरम्यान पठार भागात पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे.त्यात  वाऱ्याचा झोत मोठ्या प्रमाणावर असल्याने पावसाचा जोर देखील वाढत आहे.त्यात शेत बांध फुटी, पाझर तलाव फुटी,शेतमाल पाण्यात गेले,अशा परिस्थितीत महावितरण विभागाची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे.



त्यात अनेक ठिकाणी पोल पडने,वीज वाहक तारा तुटने यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.त्यात तारा तुटल्या असल्याने वन्य जीव,पाळीव जनावरे देखील विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे.




   

नागरिकांनी आपल्या परिसरात सतर्क राहून विद्युत तारा तुटल्या,अथवा पोल पडल्यास  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांना त्वरित माहिती कळवून सहकार्य करावे,तसेच त्या भागातील वीज पुरवठा खंडित करून होणारे अनर्थ टाळण्यास मदत करावी .


निखिल शेलार

( सहाय्यक अभियंता घारगांव १ )



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु