कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर /( सतीष फापाळे) तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे येथे विजवाहक तारेच्या धक्क्याने कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वनकुटे गावा अंतर्गत असणाऱ्या चिमटा रोड परिसरातील अशोक भाऊ कारंडे यांच्या शेतजमिनी जवळ पावसाने विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत असताना .तेथून कोल्हा मार्गक्रमण करत असताना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे.
दरम्यान पठार भागात पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे.त्यात वाऱ्याचा झोत मोठ्या प्रमाणावर असल्याने पावसाचा जोर देखील वाढत आहे.त्यात शेत बांध फुटी, पाझर तलाव फुटी,शेतमाल पाण्यात गेले,अशा परिस्थितीत महावितरण विभागाची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे.
त्यात अनेक ठिकाणी पोल पडने,वीज वाहक तारा तुटने यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.त्यात तारा तुटल्या असल्याने वन्य जीव,पाळीव जनावरे देखील विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात सतर्क राहून विद्युत तारा तुटल्या,अथवा पोल पडल्यास महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांना त्वरित माहिती कळवून सहकार्य करावे,तसेच त्या भागातील वीज पुरवठा खंडित करून होणारे अनर्थ टाळण्यास मदत करावी .
निखिल शेलार
( सहाय्यक अभियंता घारगांव १ )
Comments
Post a Comment