कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अथक प्रयत्नानंतर हल्लेखोर जेरबंद


संगमनेर/ तालुक्यातील साकुर परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून एका माकडाने उच्छाद मांडला होता. तसेच बालके व ग्रामस्थांवर थेट हल्ले केले व  चावा घेत जखमी केले होते. त्यामुळ परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. तसेच बुधवारी सायंकाळी साकुर येथील दोन मुलींवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केले होते. जवळपास २७ व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केल्याची माहिती आहे. मात्र माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर या माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. 


दरम्यान शुक्रवारी संगमनेर वनविभाग -३ चे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तास्करवाडी रोड वर वनविभागाचे कर्मचारी हनुमंत घूगे, सुहास उपासणे, संतोष पारधी, हरिश्चंद्र जोजार, बाळासाहेब फटांगरे, रामदास वर्पे यांनी रेस्क्यु ऑपरेशन केले. यासाठी स्थानिक सागर डोके, रामा केदार, राजू झिटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी माकडाला पकडण्यासाठी तास्करवाडी रोडलगत पिंजरा लावण्यात आला होता. यावेळी माकडाला पकडण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. माकड पिंजऱ्यात अडकले होते पण त्याने तेथून पुन्हा धूम ठोकली होती. त्याचवेळी माकडाला बधिरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे माकड जेरबंद होणार अशी खात्री वनविभागाला होती. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाचा शोध घेत मोहीम राबविली. त्यानंतर काही तासांच्या आत अथक प्रयत्नानंतर माकडाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

परंतु साकुर परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून माकडाने चांगलाच धूमाकूळ घातल्याने घबराट पसरली होती. माकड अचानकपणे कुणावरही हल्ले करत अंगावर धावून येत होते. विशेषता माकड लहान मुलांना टारगेट करत होते. मात्र वनविभागाने अथक परिश्रम घेत माकड जेरबंद करण्यासाठी यशस्वी ठरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु