कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगावच्या उपसरपंच पदी जया गाडेकर

 


संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी जया राजेंद्र गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या सभागृहात शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी प्रशासनाचे नियमांचे पालन करून पार पडली आहे.

अध्यादेशिये अधिकारी सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर सचिव म्हणून ग्रामसेवक गिरीश धराडे यांनी काम पाहिले उपसरपंच पदासाठी जया गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे

 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने मला आज उपसरपंच पदाची जी संधी मिळाली. त्यामुळे मी भारावून गेली आहे. गावच्या विकासाची या संधीचे नक्कीच सोने करण्याचा अतोनात प्रयत्न करत राहील.  गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच एकोपाने अद्यापपर्यंत काम करत आलो आहे भविष्यातही सरपंच आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली  विकासाचा रथ पुढे चालू ठेवू .


सौ.जया गाडेकर

(नवनिर्वाचित उपसरपंच घारगांव)

        


         

आज जया गाडेकर या उपसरपंच झाल्या आहेत त्यामुळे दोन्ही महिला सरपंच ,उपसरपंच असल्याने  महिलांच्या ज्या  अडी अडचणी असतील त्या सर्व सोडवण्यात प्रथम प्राधान्य देऊ सध्या ग्रामपंचायतची विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी विकास  कामे सुरू आहेत जेवढी कामे करता येईल ती सर्व कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत .आणि हा विकासाचा रथ पुढे असाच चालू ठेवणार आहोत .त्यामुळे भविष्यात आदर्श गाव घारगाव हे  विकास कामांचे मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही .


सौ.अर्चना आहेर

(सरपंच ग्रामपंचायत घारगांव)


 यावेळी ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु