कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बिबटयाच्या हल्ल्यात कालवड ठार

 संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावा अंतर्गत असणार्या बावपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे. 



         याबाबत अधिक माहिती अशी की नितीन मुरलीधर करंजेकर हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत बावपठार येथे राहत आहेत.व शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करत आहेत. त्यांच्याकडे तीन गायी असून मंगळवारी पहाटे घरासमोर बांधलेल्या दिड वर्षाच्या कालवडी वर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात कालवड जागीच ठार झाली आहे. त्यामुळे करंजेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला 



     दरम्यान बावपठार परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तर शेतकऱ्यांनाही शेतात कामधंदा करण्यासाठी भिती वाटत आहे त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी एकनाथ करंजेकर, नितीन करंजेकर, अशोक करंजेकर, राजेंद्र करंजेकर,लहानभाऊ करंजेकर, विकास करंजेकर,सारंगधर भागवत, रामनाथ भागवत,किशोर,भागवत,ज्ञानदेव भागवत, नानासाहेब भागवत,सबाजी भागवत,मारूती भागवत यांसह आदि शेतकर्यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु