कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

ग्रामीण जीवनोन्नती अभियानद्वारे कर्ज वाटप मेळावा संपन्न.

डोळासणे येथे महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा संपन्न.


सतीश फाफाळे


   संगमनेर / तालुक्यातील पठार भागातील डोळासणे गावातील काळ भैरव मदिर परिसरात शनिवार  दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी  महिला स्वयंम सहायत्ता समूहाचे बचत गटांना कर्ज वाटप मेळावा घेत महिला बचत गटांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे.


       महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती  व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा डोळासणे, व तालुका अभियान कक्ष पंचायत समिती संगमनेरच्या वतीने भव्य कर्ज वाटप मेळावा  पार पडला आहे. यावेळी कर्ज वितरण गट विकास अधिकारी अनिल नागणे  विस्तार अधिकारी डोके ,तालुका व्यवस्थापक मार्केटिंग, कृती समितीचे महेश पारधी ,प्रशांत पानसरे,भाऊसाहेब शिंदे,सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे चंदन मंगलम,गीतांजली काटकर शाखा व्यवस्थापक सागर गोडसे, नवले मॅडम ,रवींद्र खलाटे आदी उपस्थित होते.

     यावेळी बँकेने मागील वर्षी दिलेले पहीले कर्ज नियमित भरलेल्या २२ गटांना  एकूण ३८ लाख ४० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत  सबसिडी   ३५% टक्के  अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनचा व्यवसाय करणाऱ्या एक लाभार्थ्याला २० लाख रुपये असे एकूण ५८ लाख ४० हजार रुपये रक्कमेचे  कर्ज वाटप करण्यात आले आहे..


आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन केले त्यानुसार त्यांनी बचत गट स्थापन करून बचत करण्यास सुरवात केली.त्यातून त्यांना बचतीची सवय लागली.तसेच बँक खात्याशी संलग्न झाल्याने महिला आर्थिक साक्षर बनल्या आहेत.या योजनेतून महिलांना कमी व्याजदरात बँक कर्ज उपलब्ध करून दिले.त्यांनी त्याची नियमित परतफेड केल्याने आता त्यांना नव्याने नवीन व्यवसायासाठी कर्ज वाटप केले आहे.


महेश पारधी

( प्रभाग समन्वयक जी. प. गट साकुर)


 या योजनेतून महिला साक्षर बनल्या आहेत.त्यांना नवीन व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन केले.आणि त्यांना पूर्वी महिला बचत गटांना इतर सोर्स मधून कर्ज उपलब्ध होत होते.परंतु त्याचा व्याजदर परवडेबल नसल्याने व्यवसायात कमी नफा शिल्लक राहत असल्याने नवीन कर्ज महिला बचत गट नाकारत होते.आता कमी व्याजदरात त्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत असल्याने महिला देखील यात उत्स्पूर्त सहभाग घेत आहे.यातून नक्कीच महिला बचत गटांची प्रगती होईल.आणि इतर महिला बचत नवीन व्यवसायासाठी गटांना देखील प्रेरणा मिळणार आहे.


अनिल नागणे 

(गट विकास आधिकारी)

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु