कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

साकुरमधील हल्लेखोर जेरबंद होणार का ?

 

साहेब तो हल्लेखोर जेरबंद होणार का ? अशी म्हणण्याची वेळ भयभीत ग्रामस्थांवर आली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे संगमनेर तालुक्यातील  साकुर परीसरातील बिरेवाडी येथे गेल्या काही दिवसांपुर्वी माकडाने अनेकांवर हल्ले करत जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात  आता साकुर गावठाण परीसरात या  माकडाने उच्छाद मांडला असून दररोजच बालके व ग्रामस्थांवर  हल्ले करत चावा घेत असल्याने  नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.

 बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी साकुर येथील एका मुलीवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना  सायंकाळी घडली आहे. चावा घेत मुलीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर दुखापत केली आहे. नगमा वसिम मोमीन असे या जखमी मुलीच नाव आहे. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले आहे. तसेच माकड थेट विरभद्र विद्यालयातील शाळेत घुसले होते. त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थी घाबरले होते. वन विभागाने लवकरात लवकर या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहे . वनविभागही माकड पकडण्याचा प्रयत्न करत आहे परंतू हे माकड वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होत आहे

साकुरसह बिरेवाडी येथे अचानक येऊन माकडाने दहशत निर्माण करत बालके व ग्रामस्थांना चावा घेत जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १० ते १५ दिवसांपासून माकडाने परिसरात धूमाकूळ घालत ग्रामस्थांना चावा घेत जखमी करत आहे. माकडाच्या दहशतीने साकुर परिसरात घबराट पसरली आहे. माकड ग्रामस्थांसाठी मनस्ताप ठरत असून अचानकपणे कुणावरही हल्ले करत आहे. तसेच  अंगावर धावून येत आहे. विशेषता माकड लहान मुलांना टार्गेट करत हल्ले करत आहे

वनविभाग माकड जेरबंद करण्यासाठी अपयशी ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे साहेब..आतातरी त्या हल्लेखोर माकडाला जेरबंद करा अशी आर्त साद साकूरकर वनविभागाला घालताना दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु