कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

सर्व सामान्यांचा आधारवड: अॅड मा.अमितजी धुळगंड

 

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील  रहिवासी आदर्श व्यक्तीमत्त्व  एॅडवोकेट अमित धुळगंड यांचा वाढदिवस  आज मंगळवार दिनांक २६ जुलै रोजी मांडवे ग्रामस्थांच्या उपस्थिती साजरा होत आहे,

मांडवें गावासाठी गोरगरिबांचे कैवारी म्हणून, अॅडवोकेट अमित धुळगंड यांची ओळख आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे वकीली पेशा सांभाळत असताना ते गावातील वाद गावातच मिटले पाहीजेत, सर्व सामान्य नागरिकांचा वेळ,पैसा वाचावा यासाठी धुळगंड हे नेहमी प्रयत्नवादी राहतात. व गावातील वाद ते गावातच मिटवतात.   अनेकांच्या शासन, प्रशासन स्तरावरील व इतर अडचणी सोडवून मोठी मदत करतात,



  त्यामुळे गावातील एक सर्व समावेशक तरूण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं आहे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता ते जनतेचे काम करण्यासाठी अहोरात्र तत्पर  असतात, आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साकूर परीसराच्या वतीने साजरा होत आहे. 

अश्या या अवलिया व्यक्तीमत्त्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु