कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

दुचाकी वाचविण्याच्या नादात पिक अप महामार्गावर उलटली : तर दुचाकीस्वार...

 


पठारवार्ता : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यानजीक पिक अपने विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला  धडक बसल्याने पिकअप महामार्गावर उलटल्याची घटना गुरवारी दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,किशोर आढाव राहणार सायखेडा नाशिक हे त्यांच्या ताब्यातील पिक अप क्रमांक एम एच १५ इ जी ही घेऊन आळेफाट्याकडून नाशिकच्या दिशेने चालले होते गुरवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ते आंबीखालसा परीसरात आले असता नारायण रामदास भागवत हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १४ एच इ ६८७१ ही घेऊन विरुद्ध दिशेने चालले होते. त्याच दरम्यान पिकअप व दुचाकींची धडक होऊन पिक अप महामार्गावर उलटली तरी दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भागवत हे जखमी झाले.

घटनेची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमीला खासगी रुगणवाहीकेतून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठवले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल भुतांबरे , पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली. दरम्यान महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सोनवणे, मनेश शिंदे ,बर्डे, उमेश गव्हाने आदि घटनास्थळी दाखल झाले.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु