Posts

Showing posts from September, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

मांडवे बुद्रुक प्रा.शाळेमध्ये बालकृष्णाने फोडली दहीहंडी

Image
  संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मांडवे बुद्रुक या ठिकाणी गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व श्री राधा यांच्या वेशभूषा करून उत्तम सादरीकरण केले . वेशभूषेतील श्रीकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मांडवे गावातील अनेक ग्रामस्थ तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नांगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमासाठी श्री शेंडगे सर श्री भांड सर श्री साळवे सर व श्री कोरडे सर यांनी मेहनत घेतली यावेळीशाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध कृष्ण गीतांवर ठेका धरत उत्तम नृत्य सादर केले आपल्या मातृभूमीचे आपल्या उज्वल परंपरेचे आणि समृद्ध संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे शाळेमध्ये नेहमीच आयोजन केले जाते.  यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो शाळेकडून व सर्व शिक्षकांकडून सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील कीर्ती गिरजू धुळगंड हीची मुंबई पोलीस दलात निवड.

Image
  संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील कीर्ती गिरजू धुळगंड हीची मुंबई पोलीस दलात निवड. मांडवे बुद्रुक येथील कीर्ती धुळगंड हीचा विवाह बिरेवाडी येथील अधिक जिजाबापू गळंगे यांच्याशी विवाह झाला होता. तर दोन वर्षानंतर तिचे पती अधिक गळंगे यांच अपघाती निधन झालं होतं. कीर्ती हिला एक मुलगी असून. कीर्तीने स्वतःच्या मेहनती आणि जिद्द चिकाटीवर मेहनत करून पोलीस भरती ला सुरुवात केली, तर संगमनेर येथे अकॅडमी करून आपल्या मुली कडे बघून पोलीस मध्ये भरती व्हायचं ठरवलं. तर आज सकाळी तिचा निकाल आल्यानंतर पोलीस मध्ये भरती झालेलं समजलं. या सर्व पाठीमागे तिचे आई-वडील तसेच सासरचे सासरे सासू  यांचा मोलाचा वाटा आहे. तर कीर्तीच्या या मेहनती बद्दल मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रतिनिधी - रमजान शेख